मातृदिन ----------आमच्यावेळच्या आया प्रेमळ असतीलहि पण त्या पेक्षा कर्तव्य कठोर जास्त होत्या अस वाटतंय ,उगीच बाबा ,पुता ,सोनू ,मोनू हा प्रकार नाही .जेवणात ,खाण्यापिण्यात सुद्धा माफक लाड नाहीतर "खायचं तर खा नाहीतर रहा उपाशी "किवा "रडलास तरी चालेल ,काहीही मूत आटत नाहीये "हे बोधामृत ठरलेल .
एकदिवस आईने बाहेरून येऊन फतवा काढला "निवास उद्यापासून सकाळी ७ वाजता बालक मंदिर ".मी माणिक [बालमंदिरातील बाई] जवळ आत्ताच बोलल्ये.आमच्या वेळी बालकमंदिर होती प्ले ग्रुप नव्हते ,मंदिराचा खेळ खंडोबा झाला नव्हता.माझी हे ऐकल्यावर मुसमुसायला सुरवात ,आई ने लक्षच दिले नाही ,ती माझ्यासाठी आणलेली दगडी पाटी कोळशाने घासून लक्ख करीत होती .ते झाल्यावर तिने माझी मुलाखत घेतली ,तुझ नाव सांग मग मी रडत "श्रीनिवास उ उ केशव चितळे ,मुक्काम उ उ पोस्ट चिपळूण ,जिल्हा रत्नागिरी ,देश भारत ,खंड आशिया .रडायला काय झाल ? मला नाही जायचं बालक मंदिरात . या दप्तरात हि पाटी भर ,दगडी पेन्सिलला टोक काढ ,पेन्सिल खायची नाही ,तोंडात घालायची नाही ,आणि हो पाटीला पुसायला जर थुंकी लावलीस तर सरस्वतीदेवी रागावते ,काहीही विद्या येणार नाही .हळूहळू मी भोकांड पसरायच्या मूड मध्ये .तेवढ्यात काकू आली आणि तिने मला पदरात घेतले "शामल[माझी आई] काय तुझ चाललय बालक मंदिर ,बालक मंदिर ,मी सांगत्ये निवास अजिबात उद्या जायचं नाही ,परवा पासून जायचं ",म्हणजे हि देखील तिला सामील .मग दोघींनी मिळून थोडावेळ माझी समजूत काढली अरे बाबा शाळेत जाऊन विद्या शिकला नाहीस तर मोठा कसा होशील ? तुला मोठा साहेब व्हायचं आहे ना ?माझ रड थांबेना मग मोठी आई [काकू ]मला स्वयंपाक घरात घेऊन गेली हातावर गुळाचा खडा ,"आधी रड थांबव ,हा खा आणि जा अमळ देवळाशी खेळायला .थोडावेळ संकट टळल या आनंदात मी पळालो ,उशीर झाला तरी देवळात बसलेला ,आई आली आणि म्हणाली घरी चल ,मी म्हणालो मला नाही यायचं तू उद्या बालक मंदिरात पाठवशील .आई मारुत्या गुरवाला म्हणाली मारुत्या त्याला फरफटवीत थोड्या वेळाने घरी आण नाही ऐकला तर गठडी वळून घेऊन ये .आल्यावर सरबत्ती सुरु अरे शाळेत जाणार नाहीस मग शेणगोठा करून गुर का चरायला नेणार आहेस तस तरी सांग म्हणजे हरी उदेकाला उद्या पासून येऊ नको सांगत्ये ,तरीही माझ रडण सुरु ,मग जवळ घेऊन पदराने माझ तोंड पुसून म्हणाली अस करू नये बाळा,शाळेत जायलाच हव ,शिकायला हव ,मोठ व्हायला हव ,१० /१५ मिनिटे समजवण्यात गेली तरी माझ रड थांबेना मग चौदाव रत्न ,केरसुणीचा एक हिर काढून सपासप माझ्या पोटरीवर प्रहार चालू झाले "म्हणे शाळेत जाणार नाही ,दळभद्री लक्षण ,उद्या पासून जेवण बंद ............" या सगळ्या प्रकारात घरातील वडिलधार कोणीही मध्ये पडल नाही .
रात्री झोपलो तेव्हा पायावरून हात फिरत होता ,आई कसल तरी मलम पायाला लावीत होती आणि रडत होती .
दुसऱ्या दिवशी सकाळी मी निमूट बालकमंदिराच्या रस्त्याला लागलो आणि सात वाजता प्रार्थना सुरु झाली "बैसली मयुरा वरती देवी शारदा वरदा देवी शारदा ".
एकदिवस आईने बाहेरून येऊन फतवा काढला "निवास उद्यापासून सकाळी ७ वाजता बालक मंदिर ".मी माणिक [बालमंदिरातील बाई] जवळ आत्ताच बोलल्ये.आमच्या वेळी बालकमंदिर होती प्ले ग्रुप नव्हते ,मंदिराचा खेळ खंडोबा झाला नव्हता.माझी हे ऐकल्यावर मुसमुसायला सुरवात ,आई ने लक्षच दिले नाही ,ती माझ्यासाठी आणलेली दगडी पाटी कोळशाने घासून लक्ख करीत होती .ते झाल्यावर तिने माझी मुलाखत घेतली ,तुझ नाव सांग मग मी रडत "श्रीनिवास उ उ केशव चितळे ,मुक्काम उ उ पोस्ट चिपळूण ,जिल्हा रत्नागिरी ,देश भारत ,खंड आशिया .रडायला काय झाल ? मला नाही जायचं बालक मंदिरात . या दप्तरात हि पाटी भर ,दगडी पेन्सिलला टोक काढ ,पेन्सिल खायची नाही ,तोंडात घालायची नाही ,आणि हो पाटीला पुसायला जर थुंकी लावलीस तर सरस्वतीदेवी रागावते ,काहीही विद्या येणार नाही .हळूहळू मी भोकांड पसरायच्या मूड मध्ये .तेवढ्यात काकू आली आणि तिने मला पदरात घेतले "शामल[माझी आई] काय तुझ चाललय बालक मंदिर ,बालक मंदिर ,मी सांगत्ये निवास अजिबात उद्या जायचं नाही ,परवा पासून जायचं ",म्हणजे हि देखील तिला सामील .मग दोघींनी मिळून थोडावेळ माझी समजूत काढली अरे बाबा शाळेत जाऊन विद्या शिकला नाहीस तर मोठा कसा होशील ? तुला मोठा साहेब व्हायचं आहे ना ?माझ रड थांबेना मग मोठी आई [काकू ]मला स्वयंपाक घरात घेऊन गेली हातावर गुळाचा खडा ,"आधी रड थांबव ,हा खा आणि जा अमळ देवळाशी खेळायला .थोडावेळ संकट टळल या आनंदात मी पळालो ,उशीर झाला तरी देवळात बसलेला ,आई आली आणि म्हणाली घरी चल ,मी म्हणालो मला नाही यायचं तू उद्या बालक मंदिरात पाठवशील .आई मारुत्या गुरवाला म्हणाली मारुत्या त्याला फरफटवीत थोड्या वेळाने घरी आण नाही ऐकला तर गठडी वळून घेऊन ये .आल्यावर सरबत्ती सुरु अरे शाळेत जाणार नाहीस मग शेणगोठा करून गुर का चरायला नेणार आहेस तस तरी सांग म्हणजे हरी उदेकाला उद्या पासून येऊ नको सांगत्ये ,तरीही माझ रडण सुरु ,मग जवळ घेऊन पदराने माझ तोंड पुसून म्हणाली अस करू नये बाळा,शाळेत जायलाच हव ,शिकायला हव ,मोठ व्हायला हव ,१० /१५ मिनिटे समजवण्यात गेली तरी माझ रड थांबेना मग चौदाव रत्न ,केरसुणीचा एक हिर काढून सपासप माझ्या पोटरीवर प्रहार चालू झाले "म्हणे शाळेत जाणार नाही ,दळभद्री लक्षण ,उद्या पासून जेवण बंद ............" या सगळ्या प्रकारात घरातील वडिलधार कोणीही मध्ये पडल नाही .
रात्री झोपलो तेव्हा पायावरून हात फिरत होता ,आई कसल तरी मलम पायाला लावीत होती आणि रडत होती .
दुसऱ्या दिवशी सकाळी मी निमूट बालकमंदिराच्या रस्त्याला लागलो आणि सात वाजता प्रार्थना सुरु झाली "बैसली मयुरा वरती देवी शारदा वरदा देवी शारदा ".
Ek number kaka
ReplyDeleteसाधा आणि सुखी काळ होता तो
ReplyDelete