अरविंद गंडभीर हायस्कूल .
भव्य हिमालय तुमचा अमुचा,केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा,मानत पूजीन रायगडा !
तुमच्या अमुच्या गंगा यमुना,केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ,प्यार मला छाती निधडी !!
जोगेश्वरीला निघालो होतो,आमच्या शाळेचा अमृतमहोत्सव, आमच्या शाळेचा.डोक्यात शाळा त्याकाळातील जोगेश्वरी,आमचे सांदिपनी हा विषय आणि ओठात कविवर्य वसंत बापटांची ही सुंदर कविता.
वास्तविक शाळा सोडून ३५/४० वर्ष झाली,जोगेश्वरी सोडून १५
वर्ष झाली तरी अजुन या आठवणी घोन्घावायला लागल्या कि डोळ्यातील पाण्यामुळे समोरील काही दिसेनास होत ,मी चष्मा पुसायचं निम्मित करून डोळे टिपतो.
मुलगी विचारते बाबा काय झाल ?नकळत माझ्या तोंडून बाहेर पडत.
बाळ पणीचे सगे सोबती,आठवणीना अजुनी झोंबती
कोणी सज्जन कोणी दुर्जन,लहान कोणी कुणी वृद्धपण
या सर्वानी मिळून घडविली,जशी घडविली तशीच घडली
आयुष्याची घडी,वाहतो ही दुर्वांची जुडी !
जोगेश्वरी,त्यावेळी मुंबईचे एक उपनगर,उपनगर कसले हद्दपार लोकांच आगर. श्री.राम दशरथ रघू आणि श्रीकृष्ण वासुदेव यादव इथे येऊन गेल्याचे पुराण व इतिहासाला ठाऊक नाही पण त्यांचे वंशज इथे १९६० च्या आसपास राज्य करीत होते.स्वतःच्या भागवानला झुमरीतलैयाला ठेऊन गाई म्हशींचा संसार करीत होते.गाईम्हशींच्या गोठ्याना तबेला म्हणत जणू घोडा आणि म्हशींचा संकर.नगरपालिकांच्या जागा बाळकावित चाळी बांधायचे आणि मराठी अत्यंत गरिबलोगोंकू पागडी वर द्यायचे.होते सगळे दादा आजच्या भाषेत भाई पण लोकप्रिय नाव भय्या.१९६२ साली, दस्युनी कौरवांना बडवले तसेच येथील मराठी जनानी भय्यांना बडवले या निमित्ताने दोन गोष्टी झाल्या ठराविक अंतरावर पोलीसचौक्या आल्या भैय्याचे राज्य खालसा झाले ते बांद्रा बाजूला गेले व कृपाशंकर झाले.फलनवा,का करी? हे भोजपुरी शब्द मी ओम् केशावायनमःच्या आधी शिकलो.
मला काहीकाही कोडी आहेत अमुक ही पेठ,वाडी,नगर.पाट,आळी हे कशावरून ठरवितात.बांद्रेकर वाडी,मजास वाडी,मेघ वाडी,शाम नगर.समर्थ नगर,अंबिका नगर,सुभाष नगर ह्या जोगेश्वरीच्या पोस्टाच्या सोयीसाठी फाडलेल्या चिंध्या.हो कालिदासाच्या यक्षाने मेघदूतातर्फे [मेघ वाडी],पाठविलेला संदेश समर्थ नगरात समर्थांच्या हाती पडायचा.
यातील दोन चिंध्या मात्र त्याकाळी खास होत्या त्यातील एक म्हणजे बांद्राप्लॉट,ही थोडीशी उंचावर ,मेघवाडीच्या डोक्यावरील टेंगुळ. अपसव्य लिपी असणाऱ्यांची वस्ती,एकंदर प्रकरण भितीदायकच व गुढ होते.आम्ही काही मित्र तिथे क्यारम खेळायला जायचो तेव्हा इतरांच्या चेहऱ्यावर वेडात मराठे वीर दौडले सात मधील त्या वीरांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील कळ! असायची.राधाबाई चाळीचे पानिपत व नंतरचे मुंबई दहनाची सुरवात येथेच झाली
दुसरी त्यावेळची खास असणारी चिंधी म्हणजे सोसायटी रोड, ही म्हणजे द्रौपदीच्या भरजरी शेल्याची फाडलेली.
पूर्वी पुण्यात डेक्कनला जें वलय होत तेच वलय त्यावेळी या भागाला होत.जोगेश्वरीत असून गावाशी फारसा संबंध नव्हता आम्ही बाकीचे पाटाखाली प्यांट ठेऊन इस्त्री करणारे ,मिळेल ती पिशवी दप्तर म्हणून वापरणारे,पण इथली मुल,मुली कायम हमामच्या वडीचा ताजेपणा चेहऱ्यावर असलेली,बुट वापरणारी असायची.क्रिकेटच्या म्याचला फुल युनिफॉर्म असलेला राजू अठवणकर अजूनही आठवतो.एकदा इथे राहणाऱ्या एका मित्राकडे मी अभ्यासाला गेलो होतो तेव्हा ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास आले मी एवढा भाराउन गेलो होतो आमच्याकडे म्हणजे तांब्याभांडे समोरनेऊन आदळणे. आई ही व्यक्ती एवढी छान आणि व्यवस्थित असते हे पाहून.थोडा वेळ माझा अशीच अमुची आई असती म्हणणारा शिवाजी झाला होता.शरीराने जोगेश्वरीत आणि मनाने नारळ मधाचे असणाऱ्या आपल्या गोव्याच्या भूमीत मंगेशीच्या किवा शांतादुर्गेच्या बल्क!व मध्ये असणारी बेळगाव,गोवा,कारवर,मंगलोर,बंगलोर या प्रांतातील ही मंडळी होती.
तिसरा भाग म्हणजे गुंफा ही कोणी खोदली त्याचा इतिहास फारसा माहित नाही.शंकरबाप्पा आणि जोगेश्वरीच मंदिर आहे ,अवाढव्य आहे पण त्याची पुरातत्व खात्याकडून फारशी निगा नाही अहो रायगड म्हणजे आपला मानबिंदू त्याकडे सरकारच लक्ष नाही मग या गुंफेला कोण विचारतो.शंभो शिखरीचा राण! खरा पण येथे शंभूच्या शिरावरच असंख्य चाळी शंकराच्या जटे सारख्या पसरल्या आहेत आणि त्या जटेमधून वाहणारी गटारगंगा ही आहे.
गटारगंगा हा आमच्या बोंद्रेसरांचा आवडता शब्द.या सोसायटी रोड वरच जोगेश्वरी एजुकेशन सोसायटीने १९३२ साली न्यू इंग्लिश स्कूल चालू केले.कालांतराने त्याचे अरविंद गंडभीर हायस्कूल असे बारसे झाले.आम्ही या शाळेचे विद्यार्थी.
जोगेश्वरीत साधारण ७वी पर्यंत म्युन्सिपाल्टी शाळेत जाणाराच विद्यार्थी वर्ग होता आणि त्याकाळी या शाळा देखील उत्तम शिकवीत असत खाण्याची खिचडी भरवण्यापेक्षा ज्ञानाची खिचडी भरवीत असत.प्यायला होल दुधाची बाटली मिळत असे.माझ्या आईने मला ५ वीत हायस्कुलात घालायची भुणभुण वडिलांच्या पाठी लावली होती वडिलांनी गारंबीचा बापू या कादंबरीतील फेमस वाक्य आईच्या तोंडावर फेकल होत,पिट!त बसला काय किवा खुर्चीच तिकिट काढल काय घोड्याच गाढव का दिसणार आहे ?हायस्कूलचि २.५० रु.फी परवडणार नव्हती ही त्यातील गोम होती.आणि खर म्हणजे आम्हालाही हा कॉम्प्लेक्स कधी आला नाही.
मुख्य शाळा दोन एक अरविंद गंडभीर आणि दुसरी बंदिवली हायस्कूल पण एक ऑक्सफर्ड आणि दुसरी कोल्हापूर युनिवर्सिटी एवढा फरक आम्हाला त्यावेळी अज्ञानाने वाटायचा.बंदिवलीतील विद्यार्थ्याकडे सेकंड ए.सी.चा प्रवासी जनरल बोगीतील प्रवाशांना पहातो तसे अरविंदचे विद्यार्थी पहात हे नक्की.
सातरस्त्याला किवा फायगार्डनला जशी मध्ये मोकळी जागा आणि भोवती रस्त्याच एक वर्तुळ आहे तसच आमच्या सोसायटी रोड मधल्या जुन्या शाळेला आहे या मधल्या मोकळ्या जागेत आमची पी.टी.,८वि अ विरुद्ध ९वी क असे अनेक खेळांचे सामने,ग्यादरिंग होत असत.इथेच आमच्या मंग्या सावंतने सुरेख संभाजीचा रोल केला होता.येसूबाई मीना बोरवणकर होती जाऊदे फार खोलात शिरत नाही .आमच्या नशिबी एवढ्या सुगंधी आठवणी कुठल्या माझ्या लक्षात आहे ते शिक्षा म्हणून त्या रस्त्याला बेडूक उडयामारत मारलेली फेरी.
साक्षात्कार व्हायला वडा पिंपळाचे झाड किवा अजानवृक्ष हवा अस थोडच आहे आमच्या सारख्या अज्ञानेश्वराना पदोपदी साक्षात्कार होतात.चित्रकलेचा तास [त्रास],वाघ म्याडमनी पुंगी वाजविणारा गारूडी हे चित्र काढायला सांगितली,माझी एकतर पुंगी गारूडया सारखी यायची नाहीतर गारुडी पुंगी सारखा,वाघ म्याडमनी माझी भर वर्गात पुंगी वाजविली त्या दिवशी साक्षात्कार झाला हवतर त्या गारुड्या बरोबर चमुरा म्हणून नाचेन पण चित्रकला हा आपला प्रांत नाही.
मराठी पद्याला बोंद्रे सर.ऐल तट!वर,पैल तट!वर ही कविता मर्ढेकरांना कळली नाही तेव्हडी आपल्याला कळली अशा अविर्भावात ते तट डाव्या उजव्या हाताने दाखवीत शिकवायचे.एकदा वर्गात प्रश्न विचारली काव्य म्हणजे काय ? मी काय उत्तर दिल माहित नाही पण सरांना ते पटल होत,तेव्हा दुसरा साक्षात्कार झाला याप्रांतात आपण थोडी चावटी करू शकतो.
अनेक आणि उदंड आनंदाचे क्षण या शाळेने दिले,आरस बाईना प्रथम पहिले [म्याडम क्षमा करा] त्या दिवशी आपण तरुण झालो अस वाटल होत.
शाळेत देवमाणूस हे शिक्षकांनी नाटक केली होती,नागवेकर सरांनी दादाची भूमिका केली होती.चोगले बाई,हळदवणेकर म्याडम यांनी त्यात भूमिका केल्या होत्या.नागवेकरसर थोडे राजा गोसावी सारखे दिसायचे.देव माणसच होती ही,विद्यार्थ्यांवर शाळेवर आपल्या पोटच्या पोरा सारख प्रेम केली.करंडेबाई,गावस्करबाई,सामंतसर,प्रभूम्याडम,पेंडभाजेसर,काळे ओंक,कुंटेसर,वाघम्याडम.संस्कृतच्या तासाला शैले शैले न माणीक्यम कुंटेसर शिकवीत असताना शैला नामक वर्गसुंदरीची झालेली एन्ट्री.
ह्या सर्वानी आम्हाला द्रोणाचार्या सारखे अंगठा न मागता शिकवले.आणखी एका व्यक्तीचा आमचे रमाकांत आचरेकर म्हणजे क्लासचे बाबुसर यांचा उल्लेख केला नाहीतर आम्ही कृतघ्न ठरू.मामुली फी मध्ये आमच्या सर्व माकडचेष्टा सहन करून एवढ्या तळमळीने शिकवणारे बाबुसर प्रणाम.
दोन दिवसावुर्वी थत्ते काकांनी त्यांच्या शाळेचा फोटो टाकला आणि तिळा दार उघड अशी माझी अवस्था झाली डोक्यात टिपलेल्या फोटोंचे असंख्य रोल उलगडले गेले आणि त्यांना फक्त शब्दबद्ध केले एवढेच .
भव्य हिमालय तुमचा अमुचा,केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा,मानत पूजीन रायगडा !
तुमच्या अमुच्या गंगा यमुना,केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ,प्यार मला छाती निधडी !!
जोगेश्वरीला निघालो होतो,आमच्या शाळेचा अमृतमहोत्सव, आमच्या शाळेचा.डोक्यात शाळा त्याकाळातील जोगेश्वरी,आमचे सांदिपनी हा विषय आणि ओठात कविवर्य वसंत बापटांची ही सुंदर कविता.
वास्तविक शाळा सोडून ३५/४० वर्ष झाली,जोगेश्वरी सोडून १५
वर्ष झाली तरी अजुन या आठवणी घोन्घावायला लागल्या कि डोळ्यातील पाण्यामुळे समोरील काही दिसेनास होत ,मी चष्मा पुसायचं निम्मित करून डोळे टिपतो.
मुलगी विचारते बाबा काय झाल ?नकळत माझ्या तोंडून बाहेर पडत.
बाळ पणीचे सगे सोबती,आठवणीना अजुनी झोंबती
कोणी सज्जन कोणी दुर्जन,लहान कोणी कुणी वृद्धपण
या सर्वानी मिळून घडविली,जशी घडविली तशीच घडली
आयुष्याची घडी,वाहतो ही दुर्वांची जुडी !
जोगेश्वरी,त्यावेळी मुंबईचे एक उपनगर,उपनगर कसले हद्दपार लोकांच आगर. श्री.राम दशरथ रघू आणि श्रीकृष्ण वासुदेव यादव इथे येऊन गेल्याचे पुराण व इतिहासाला ठाऊक नाही पण त्यांचे वंशज इथे १९६० च्या आसपास राज्य करीत होते.स्वतःच्या भागवानला झुमरीतलैयाला ठेऊन गाई म्हशींचा संसार करीत होते.गाईम्हशींच्या गोठ्याना तबेला म्हणत जणू घोडा आणि म्हशींचा संकर.नगरपालिकांच्या जागा बाळकावित चाळी बांधायचे आणि मराठी अत्यंत गरिबलोगोंकू पागडी वर द्यायचे.होते सगळे दादा आजच्या भाषेत भाई पण लोकप्रिय नाव भय्या.१९६२ साली, दस्युनी कौरवांना बडवले तसेच येथील मराठी जनानी भय्यांना बडवले या निमित्ताने दोन गोष्टी झाल्या ठराविक अंतरावर पोलीसचौक्या आल्या भैय्याचे राज्य खालसा झाले ते बांद्रा बाजूला गेले व कृपाशंकर झाले.फलनवा,का करी? हे भोजपुरी शब्द मी ओम् केशावायनमःच्या आधी शिकलो.
मला काहीकाही कोडी आहेत अमुक ही पेठ,वाडी,नगर.पाट,आळी हे कशावरून ठरवितात.बांद्रेकर वाडी,मजास वाडी,मेघ वाडी,शाम नगर.समर्थ नगर,अंबिका नगर,सुभाष नगर ह्या जोगेश्वरीच्या पोस्टाच्या सोयीसाठी फाडलेल्या चिंध्या.हो कालिदासाच्या यक्षाने मेघदूतातर्फे [मेघ वाडी],पाठविलेला संदेश समर्थ नगरात समर्थांच्या हाती पडायचा.
यातील दोन चिंध्या मात्र त्याकाळी खास होत्या त्यातील एक म्हणजे बांद्राप्लॉट,ही थोडीशी उंचावर ,मेघवाडीच्या डोक्यावरील टेंगुळ. अपसव्य लिपी असणाऱ्यांची वस्ती,एकंदर प्रकरण भितीदायकच व गुढ होते.आम्ही काही मित्र तिथे क्यारम खेळायला जायचो तेव्हा इतरांच्या चेहऱ्यावर वेडात मराठे वीर दौडले सात मधील त्या वीरांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील कळ! असायची.राधाबाई चाळीचे पानिपत व नंतरचे मुंबई दहनाची सुरवात येथेच झाली
दुसरी त्यावेळची खास असणारी चिंधी म्हणजे सोसायटी रोड, ही म्हणजे द्रौपदीच्या भरजरी शेल्याची फाडलेली.
पूर्वी पुण्यात डेक्कनला जें वलय होत तेच वलय त्यावेळी या भागाला होत.जोगेश्वरीत असून गावाशी फारसा संबंध नव्हता आम्ही बाकीचे पाटाखाली प्यांट ठेऊन इस्त्री करणारे ,मिळेल ती पिशवी दप्तर म्हणून वापरणारे,पण इथली मुल,मुली कायम हमामच्या वडीचा ताजेपणा चेहऱ्यावर असलेली,बुट वापरणारी असायची.क्रिकेटच्या म्याचला फुल युनिफॉर्म असलेला राजू अठवणकर अजूनही आठवतो.एकदा इथे राहणाऱ्या एका मित्राकडे मी अभ्यासाला गेलो होतो तेव्हा ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास आले मी एवढा भाराउन गेलो होतो आमच्याकडे म्हणजे तांब्याभांडे समोरनेऊन आदळणे. आई ही व्यक्ती एवढी छान आणि व्यवस्थित असते हे पाहून.थोडा वेळ माझा अशीच अमुची आई असती म्हणणारा शिवाजी झाला होता.शरीराने जोगेश्वरीत आणि मनाने नारळ मधाचे असणाऱ्या आपल्या गोव्याच्या भूमीत मंगेशीच्या किवा शांतादुर्गेच्या बल्क!व मध्ये असणारी बेळगाव,गोवा,कारवर,मंगलोर,बंगलोर या प्रांतातील ही मंडळी होती.
तिसरा भाग म्हणजे गुंफा ही कोणी खोदली त्याचा इतिहास फारसा माहित नाही.शंकरबाप्पा आणि जोगेश्वरीच मंदिर आहे ,अवाढव्य आहे पण त्याची पुरातत्व खात्याकडून फारशी निगा नाही अहो रायगड म्हणजे आपला मानबिंदू त्याकडे सरकारच लक्ष नाही मग या गुंफेला कोण विचारतो.शंभो शिखरीचा राण! खरा पण येथे शंभूच्या शिरावरच असंख्य चाळी शंकराच्या जटे सारख्या पसरल्या आहेत आणि त्या जटेमधून वाहणारी गटारगंगा ही आहे.
गटारगंगा हा आमच्या बोंद्रेसरांचा आवडता शब्द.या सोसायटी रोड वरच जोगेश्वरी एजुकेशन सोसायटीने १९३२ साली न्यू इंग्लिश स्कूल चालू केले.कालांतराने त्याचे अरविंद गंडभीर हायस्कूल असे बारसे झाले.आम्ही या शाळेचे विद्यार्थी.
जोगेश्वरीत साधारण ७वी पर्यंत म्युन्सिपाल्टी शाळेत जाणाराच विद्यार्थी वर्ग होता आणि त्याकाळी या शाळा देखील उत्तम शिकवीत असत खाण्याची खिचडी भरवण्यापेक्षा ज्ञानाची खिचडी भरवीत असत.प्यायला होल दुधाची बाटली मिळत असे.माझ्या आईने मला ५ वीत हायस्कुलात घालायची भुणभुण वडिलांच्या पाठी लावली होती वडिलांनी गारंबीचा बापू या कादंबरीतील फेमस वाक्य आईच्या तोंडावर फेकल होत,पिट!त बसला काय किवा खुर्चीच तिकिट काढल काय घोड्याच गाढव का दिसणार आहे ?हायस्कूलचि २.५० रु.फी परवडणार नव्हती ही त्यातील गोम होती.आणि खर म्हणजे आम्हालाही हा कॉम्प्लेक्स कधी आला नाही.
मुख्य शाळा दोन एक अरविंद गंडभीर आणि दुसरी बंदिवली हायस्कूल पण एक ऑक्सफर्ड आणि दुसरी कोल्हापूर युनिवर्सिटी एवढा फरक आम्हाला त्यावेळी अज्ञानाने वाटायचा.बंदिवलीतील विद्यार्थ्याकडे सेकंड ए.सी.चा प्रवासी जनरल बोगीतील प्रवाशांना पहातो तसे अरविंदचे विद्यार्थी पहात हे नक्की.
सातरस्त्याला किवा फायगार्डनला जशी मध्ये मोकळी जागा आणि भोवती रस्त्याच एक वर्तुळ आहे तसच आमच्या सोसायटी रोड मधल्या जुन्या शाळेला आहे या मधल्या मोकळ्या जागेत आमची पी.टी.,८वि अ विरुद्ध ९वी क असे अनेक खेळांचे सामने,ग्यादरिंग होत असत.इथेच आमच्या मंग्या सावंतने सुरेख संभाजीचा रोल केला होता.येसूबाई मीना बोरवणकर होती जाऊदे फार खोलात शिरत नाही .आमच्या नशिबी एवढ्या सुगंधी आठवणी कुठल्या माझ्या लक्षात आहे ते शिक्षा म्हणून त्या रस्त्याला बेडूक उडयामारत मारलेली फेरी.
साक्षात्कार व्हायला वडा पिंपळाचे झाड किवा अजानवृक्ष हवा अस थोडच आहे आमच्या सारख्या अज्ञानेश्वराना पदोपदी साक्षात्कार होतात.चित्रकलेचा तास [त्रास],वाघ म्याडमनी पुंगी वाजविणारा गारूडी हे चित्र काढायला सांगितली,माझी एकतर पुंगी गारूडया सारखी यायची नाहीतर गारुडी पुंगी सारखा,वाघ म्याडमनी माझी भर वर्गात पुंगी वाजविली त्या दिवशी साक्षात्कार झाला हवतर त्या गारुड्या बरोबर चमुरा म्हणून नाचेन पण चित्रकला हा आपला प्रांत नाही.
मराठी पद्याला बोंद्रे सर.ऐल तट!वर,पैल तट!वर ही कविता मर्ढेकरांना कळली नाही तेव्हडी आपल्याला कळली अशा अविर्भावात ते तट डाव्या उजव्या हाताने दाखवीत शिकवायचे.एकदा वर्गात प्रश्न विचारली काव्य म्हणजे काय ? मी काय उत्तर दिल माहित नाही पण सरांना ते पटल होत,तेव्हा दुसरा साक्षात्कार झाला याप्रांतात आपण थोडी चावटी करू शकतो.
अनेक आणि उदंड आनंदाचे क्षण या शाळेने दिले,आरस बाईना प्रथम पहिले [म्याडम क्षमा करा] त्या दिवशी आपण तरुण झालो अस वाटल होत.
शाळेत देवमाणूस हे शिक्षकांनी नाटक केली होती,नागवेकर सरांनी दादाची भूमिका केली होती.चोगले बाई,हळदवणेकर म्याडम यांनी त्यात भूमिका केल्या होत्या.नागवेकरसर थोडे राजा गोसावी सारखे दिसायचे.देव माणसच होती ही,विद्यार्थ्यांवर शाळेवर आपल्या पोटच्या पोरा सारख प्रेम केली.करंडेबाई,गावस्करबाई,सामंतसर,प्रभूम्याडम,पेंडभाजेसर,काळे ओंक,कुंटेसर,वाघम्याडम.संस्कृतच्या तासाला शैले शैले न माणीक्यम कुंटेसर शिकवीत असताना शैला नामक वर्गसुंदरीची झालेली एन्ट्री.
ह्या सर्वानी आम्हाला द्रोणाचार्या सारखे अंगठा न मागता शिकवले.आणखी एका व्यक्तीचा आमचे रमाकांत आचरेकर म्हणजे क्लासचे बाबुसर यांचा उल्लेख केला नाहीतर आम्ही कृतघ्न ठरू.मामुली फी मध्ये आमच्या सर्व माकडचेष्टा सहन करून एवढ्या तळमळीने शिकवणारे बाबुसर प्रणाम.
दोन दिवसावुर्वी थत्ते काकांनी त्यांच्या शाळेचा फोटो टाकला आणि तिळा दार उघड अशी माझी अवस्था झाली डोक्यात टिपलेल्या फोटोंचे असंख्य रोल उलगडले गेले आणि त्यांना फक्त शब्दबद्ध केले एवढेच .
No comments:
Post a Comment