विंदा ---
विंदा करंदीकर ---मराठी काव्य प्रांतातील एक थोर शास्त्रज्ञ .
करितो आदरे सद्गुरू स्तवन ,ज्यांनी सत्याज्ञान वाढविले
धन्य पायथागोरस,धन्य तो न्युटन ,धन्य आईन्स्टाईन ब्रह्मवेत्ता
धन्य पाश्चर आणि धन्य माझी क्युरी थोर धन्वंतरी मृत्युंजय
धन्य फ्राईड आणि धन्य तो डार्विन ज्यांनी आत्मज्ञान दिले आम्हा
धन्य धन्य मार्क्स दलितांचा त्राता ,इतिहासाचा गुंता सोडवी जो
धन्य शेक्सपिअर धन्य कालिदास धन्य होमर व्यास भावद्रष्ट
फयारडे मार्कोनी व्याट राईट धन्य धन्य सारे अन्य स्वयंसिद्ध
विंदा या तुमच्या ओळींना माझ्या दोन ओळी जोडतो ..
धन्य तुम्ही विंदा धन्य ती प्रतिभा,जीवनाचे पैलू दाविले त्वा
सद्गुरुंनी द्यावे दासा एक दान ,पुन्हा पुन्हा विंदा जगती येवो .
विंदा किती श्रीमंत केलत आम्हाला ,जीवनाची गुहा अलीबाबाच्या गुहे सारखी उघडावी आणि त्यातील प्रत्येक भावनिक पैलूंनी ,सुख दुखः ,समाजवाद ,क्रांती ,गरिबी ,भांडवलशाही असे ठसवलेले दागिने असावेत आणि तुम्ही त्या प्रत्येक दागिन्याची महती आम्हाला समजावून सांगावीत अशी तुमची शंभर कशी कविता ,एकेक लखलखता दागिना .
तुम्हाला आणि कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे त्या पुरस्काराचा सन्मान .बर झाल तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाला नाहीत ,हल्लीचे अध्यक्ष बघता तर ती खुर्ची तुमची ,श्री .ना .यांची नव्हतीच ,हे म्हणजे राष्ट्रपती असणाऱ्या माणसाने गावचा सरपंच होण्यासारखे झाले असते .
साधारण १९३७ पासून तुमच्या हा एकला चालो रे चा प्रवास सुरु झाला ,एकला अशासाठी कि तुमच्या एवढे कवितेत वेगवेगळे प्रयोग करणारे फार कमी प्रवासी या पथावर होते .तुम्ही कधीही आता बघारे मी वेगळा प्रयोग करतो आहे असा आव आणला नाहीत हे करताना भाषेच्या उपयोगाचे रूढ रस्ते टाळलेत ,औचित्याच्या पारंपारिक ,रूढ संकेतांना उधळून दिलेत ,आपल्या अनुभवाशी इमान हा एकच सक्षम धागा कधीही सोडला नाहीत .रांगडे चैतन्य ,जोमदारपणा हे तुमचे वैशिष्ठ्य ,काव्याचा एक ठराविक साचा कधीच वापरला नाहीत ,तुमच्या प्रत्येक कवितेच्या घटाघटाचे रूप आगळे.आशय संपन्नता ,सखोलता ,जीवनातील अनुभवला भिडणे तुमच्या प्रत्येक कवितेत दिसते .
उफाळलेली नागीण जैशी ,जो जो तुडवी त्याला दंशी
शास्त्रास्ताना धरून हाती ,भिजवीत रक्ताची नव माती ..अस क्रांतीच रूप सांगितलत ,दुसरीकडे असे हि लिहिलेत
हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगावर हिंदी महासागरा इतके
रक्त ओतलेत तरी नाही उगवणार चिमुटभर हिरवे गवत ....
कुठलाही राजकीय विचारधारेने,कुठल्याही इझमने तुमची कविता बरबटलेली नव्हती .
खबरदार हातामध्ये शस्त्र धरलेस तर ,मला अजून जगायचे आहे ,निरभ्र आकाशातून पिक्यासोचे कबुतर उडताना पाहण्यासाठी ..असे निर्भयपणे सांगितलेत .
वर्तमानपत्रांनी सकाळी घातलेला आगीचा रतीब पितो घटाघटा
आणि प्रायश्चित्त म्हणून फिरवितो बोटे मुलांच्या जावळातून...हि सामन्याची अगतिकता हि मांडलीत.उजवी व डावी विचारसरणी सारख्याच अंतरावर खेळवलीत.दंतकथा या कवितेत
अमेरिकेतील एक एकाक्ष कुबेर वर्षभर स्वतःच्या मोटारी आणि अंगावरील सोनेरी केस मोजतो ,जास्त कोण हे अजूनही त्याला कळलेले नाही असे लिहिता त्याच कवितेत ....असे म्हणतात कि रशियामध्ये एक मोठा तुरुंग आहे .त्या तुरुंगाला गज नाहीत "आमच्या तुरुंगाला गज बसवा "असा अर्ज तेथील बंदिवानानी सरकारकडे केलाय म्हणे ..असे म्हणून दडपशाहीची खिल्लीही उडवता.सत्याचे ,परिस्थितीचे दर्शन घडविणारी उंट हि तुमची प्रतीकात्मक कविता ...तहानेसाठी प्याला मृगजळ ,भूक लागता तहान खाई ..
खय्यामाने भरले पेले ,महंमदाने रचले दोहे ,हा यात्रेकरू तिथे न खळला ,निळा पिर्यामिड शोधीत जाई ....केवढे हे दाहक दर्शन .
श्रुंगारहि तितकाच लोभस ...आज मधाची लाट अनावर ,उसळत उसळत फुटली ग ..आज घराची फुटकी कौले ,अंधाराला हसली ग .
आततायी अभंग लिहिलेत सूक्ते लिहीलीत ,मुक्तसुनिते,तालचित्रे ,बालकविता ,विरूपिका किती प्रकार हाताळलेत ,प्रत्येकावर एक वेगळा लेख होईल .
कथा रंगली ,बुवा तल्लीन झाले ..
खडीसाखरेसाठी त्यांची मधेच चुळबुळ चाले ..अशी गम्मत लिहिलीत .
तेच ते मध्ये ...पुन्हा पुन्हा तेच भोग ,आसक्तीचा तोच रोग
तेच मंदिर ,तीच मूर्ती ,तीच फुले ,तीच स्फूर्ती
तेच ओठ ,तेच डोळे ,तेच मुरके ,तेच चाळे
तोच पलंग तीच नारी ,सतार नव्हे एकतारी..असे बेचव आयुष्याबद्दल म्हणालात .धोंड्या न्हावी तर लाजबाब .नवीन यंत्रयुगाचे स्वागत करताना म्हणालात ....ये यंत्रा ये
सस्यशामल सृष्टीला आलिंगुन ,समाज पुरुषाने जे केले मैथुन
त्या उत्कट सुरतातील,विज्ञानात्मक दाहक वीर्यापासून
पिंड जयाचा बनलेला पोलादी त्या अवतारी यंत्रा
युगधर्माचे ये करण्या संवर्धन ,ये ये घेऊन क्रांतीच्या वेणाना
इतिहासाच्या गर्भाला विछ्चेदुन ,त्रीविक्रमाच्या अकराव्या अवतारा.
झपताल या कवितेत स्त्रियांचा केवढा सन्मान केलात .
आणखीन एक अशीच विश्वात्मके देवेच नात सांगणारी कविता ...
मिसिसिपी मध्ये मिसळूदे गंगा ,रहाइन मध्ये नंगा करो स्नान
सिंधुसाठी झुरो अम्याझोन थोर ,कांगो बंडखोर टेम्स साठी
नाईलच्या काठी रॉकी करो संध्या ,संस्कृती अन वंध्या नष्ट होवो
वोल्गाचे ते पाणी ,वाहू दे गंगेत ,लाभो निग्रोरेत पांढरीला !
किती लिहू आणि काय काय लिहू ?
विरूपिका तर अप्रतिम ,पिशी मावशी .सगळ्याच कविता म्हणजे एकेक रत्न .
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,हि काव्य गंगा काही अंशी आम्हाला आचमन करण्यासाठी मिळाली हे आमचे आणि या मराठी भाषेचे भाग्य .
विंदा करंदीकर ---मराठी काव्य प्रांतातील एक थोर शास्त्रज्ञ .
करितो आदरे सद्गुरू स्तवन ,ज्यांनी सत्याज्ञान वाढविले
धन्य पायथागोरस,धन्य तो न्युटन ,धन्य आईन्स्टाईन ब्रह्मवेत्ता
धन्य पाश्चर आणि धन्य माझी क्युरी थोर धन्वंतरी मृत्युंजय
धन्य फ्राईड आणि धन्य तो डार्विन ज्यांनी आत्मज्ञान दिले आम्हा
धन्य धन्य मार्क्स दलितांचा त्राता ,इतिहासाचा गुंता सोडवी जो
धन्य शेक्सपिअर धन्य कालिदास धन्य होमर व्यास भावद्रष्ट
फयारडे मार्कोनी व्याट राईट धन्य धन्य सारे अन्य स्वयंसिद्ध
विंदा या तुमच्या ओळींना माझ्या दोन ओळी जोडतो ..
धन्य तुम्ही विंदा धन्य ती प्रतिभा,जीवनाचे पैलू दाविले त्वा
सद्गुरुंनी द्यावे दासा एक दान ,पुन्हा पुन्हा विंदा जगती येवो .
विंदा किती श्रीमंत केलत आम्हाला ,जीवनाची गुहा अलीबाबाच्या गुहे सारखी उघडावी आणि त्यातील प्रत्येक भावनिक पैलूंनी ,सुख दुखः ,समाजवाद ,क्रांती ,गरिबी ,भांडवलशाही असे ठसवलेले दागिने असावेत आणि तुम्ही त्या प्रत्येक दागिन्याची महती आम्हाला समजावून सांगावीत अशी तुमची शंभर कशी कविता ,एकेक लखलखता दागिना .
तुम्हाला आणि कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे त्या पुरस्काराचा सन्मान .बर झाल तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाला नाहीत ,हल्लीचे अध्यक्ष बघता तर ती खुर्ची तुमची ,श्री .ना .यांची नव्हतीच ,हे म्हणजे राष्ट्रपती असणाऱ्या माणसाने गावचा सरपंच होण्यासारखे झाले असते .
साधारण १९३७ पासून तुमच्या हा एकला चालो रे चा प्रवास सुरु झाला ,एकला अशासाठी कि तुमच्या एवढे कवितेत वेगवेगळे प्रयोग करणारे फार कमी प्रवासी या पथावर होते .तुम्ही कधीही आता बघारे मी वेगळा प्रयोग करतो आहे असा आव आणला नाहीत हे करताना भाषेच्या उपयोगाचे रूढ रस्ते टाळलेत ,औचित्याच्या पारंपारिक ,रूढ संकेतांना उधळून दिलेत ,आपल्या अनुभवाशी इमान हा एकच सक्षम धागा कधीही सोडला नाहीत .रांगडे चैतन्य ,जोमदारपणा हे तुमचे वैशिष्ठ्य ,काव्याचा एक ठराविक साचा कधीच वापरला नाहीत ,तुमच्या प्रत्येक कवितेच्या घटाघटाचे रूप आगळे.आशय संपन्नता ,सखोलता ,जीवनातील अनुभवला भिडणे तुमच्या प्रत्येक कवितेत दिसते .
उफाळलेली नागीण जैशी ,जो जो तुडवी त्याला दंशी
शास्त्रास्ताना धरून हाती ,भिजवीत रक्ताची नव माती ..अस क्रांतीच रूप सांगितलत ,दुसरीकडे असे हि लिहिलेत
हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगावर हिंदी महासागरा इतके
रक्त ओतलेत तरी नाही उगवणार चिमुटभर हिरवे गवत ....
कुठलाही राजकीय विचारधारेने,कुठल्याही इझमने तुमची कविता बरबटलेली नव्हती .
खबरदार हातामध्ये शस्त्र धरलेस तर ,मला अजून जगायचे आहे ,निरभ्र आकाशातून पिक्यासोचे कबुतर उडताना पाहण्यासाठी ..असे निर्भयपणे सांगितलेत .
वर्तमानपत्रांनी सकाळी घातलेला आगीचा रतीब पितो घटाघटा
आणि प्रायश्चित्त म्हणून फिरवितो बोटे मुलांच्या जावळातून...हि सामन्याची अगतिकता हि मांडलीत.उजवी व डावी विचारसरणी सारख्याच अंतरावर खेळवलीत.दंतकथा या कवितेत
अमेरिकेतील एक एकाक्ष कुबेर वर्षभर स्वतःच्या मोटारी आणि अंगावरील सोनेरी केस मोजतो ,जास्त कोण हे अजूनही त्याला कळलेले नाही असे लिहिता त्याच कवितेत ....असे म्हणतात कि रशियामध्ये एक मोठा तुरुंग आहे .त्या तुरुंगाला गज नाहीत "आमच्या तुरुंगाला गज बसवा "असा अर्ज तेथील बंदिवानानी सरकारकडे केलाय म्हणे ..असे म्हणून दडपशाहीची खिल्लीही उडवता.सत्याचे ,परिस्थितीचे दर्शन घडविणारी उंट हि तुमची प्रतीकात्मक कविता ...तहानेसाठी प्याला मृगजळ ,भूक लागता तहान खाई ..
खय्यामाने भरले पेले ,महंमदाने रचले दोहे ,हा यात्रेकरू तिथे न खळला ,निळा पिर्यामिड शोधीत जाई ....केवढे हे दाहक दर्शन .
श्रुंगारहि तितकाच लोभस ...आज मधाची लाट अनावर ,उसळत उसळत फुटली ग ..आज घराची फुटकी कौले ,अंधाराला हसली ग .
आततायी अभंग लिहिलेत सूक्ते लिहीलीत ,मुक्तसुनिते,तालचित्रे ,बालकविता ,विरूपिका किती प्रकार हाताळलेत ,प्रत्येकावर एक वेगळा लेख होईल .
कथा रंगली ,बुवा तल्लीन झाले ..
खडीसाखरेसाठी त्यांची मधेच चुळबुळ चाले ..अशी गम्मत लिहिलीत .
तेच ते मध्ये ...पुन्हा पुन्हा तेच भोग ,आसक्तीचा तोच रोग
तेच मंदिर ,तीच मूर्ती ,तीच फुले ,तीच स्फूर्ती
तेच ओठ ,तेच डोळे ,तेच मुरके ,तेच चाळे
तोच पलंग तीच नारी ,सतार नव्हे एकतारी..असे बेचव आयुष्याबद्दल म्हणालात .धोंड्या न्हावी तर लाजबाब .नवीन यंत्रयुगाचे स्वागत करताना म्हणालात ....ये यंत्रा ये
सस्यशामल सृष्टीला आलिंगुन ,समाज पुरुषाने जे केले मैथुन
त्या उत्कट सुरतातील,विज्ञानात्मक दाहक वीर्यापासून
पिंड जयाचा बनलेला पोलादी त्या अवतारी यंत्रा
युगधर्माचे ये करण्या संवर्धन ,ये ये घेऊन क्रांतीच्या वेणाना
इतिहासाच्या गर्भाला विछ्चेदुन ,त्रीविक्रमाच्या अकराव्या अवतारा.
झपताल या कवितेत स्त्रियांचा केवढा सन्मान केलात .
आणखीन एक अशीच विश्वात्मके देवेच नात सांगणारी कविता ...
मिसिसिपी मध्ये मिसळूदे गंगा ,रहाइन मध्ये नंगा करो स्नान
सिंधुसाठी झुरो अम्याझोन थोर ,कांगो बंडखोर टेम्स साठी
नाईलच्या काठी रॉकी करो संध्या ,संस्कृती अन वंध्या नष्ट होवो
वोल्गाचे ते पाणी ,वाहू दे गंगेत ,लाभो निग्रोरेत पांढरीला !
किती लिहू आणि काय काय लिहू ?
विरूपिका तर अप्रतिम ,पिशी मावशी .सगळ्याच कविता म्हणजे एकेक रत्न .
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,हि काव्य गंगा काही अंशी आम्हाला आचमन करण्यासाठी मिळाली हे आमचे आणि या मराठी भाषेचे भाग्य .
No comments:
Post a Comment