तुझा भाट मी वर्णितो रामराया
सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया
महाराज दे अंगीचे वस्त्र आता
बहुजीर्ण झाली देह बुद्धी कंथा !
यातील तुझा मधील झा आणि अंत्याक्षर दीर्घ म्हणायचे ,तुझा ,सदा .महाराज मधील महा हि अक्षर ठासून म्हणायची ,स्वर साधारण पंचम किवा षड्जात .नक्की माहित नाही पण शे सव्वाशे वर्ष नक्की झाली .गुढी पाड्व्यापासून दशमी पर्यंत रात्री ०९.३० वाजता लक्ष्मी नारायण देवळात वरील श्लोकाचे सूर याच पद्धतीने म्हटले जात आहेत ,अनेक पिढ्या रामतीर्थावर इतिहास जमा झाल्या पण नवीन पिढी त्याच जोशात ,किंबहुना अधिक चांगला हा आमचा रामनवमीचा उत्सव साजरा करीत आहे .
सगळे गावकरी साधारण ०९.१५ पासून कै.गोविंद बापूंच्या अंगणात तसेच जमा होत आहेत ,काही मुल पार्वती काकुच्या घराच्या पायरीवर बसली आहेत ,एकदा हि सवाई सुरु झाली कि खिशातील टोपी डोक्यावर चेपून देवळात प्रवेश करायचा ,लक्ष्मी नारायणाला नमस्कार ठोकायचा आणि गाभार्याच्या दरवाजा बाहेर दोन बाजूला दोन भाग करून गळ्यात ढोलकी आणि टाळ घेऊन उभे राहायचे ,पूर्वी रामाच्या सन्मुख देवळाच्या वेशीवर हनुमंतराय होते त्यांना आता देवळाच्या नूतनी करणात देवळात जागा मिळाली ,म्हणजे अंजनीपुत्र जागेवरच आहेत ,मंदिराची भिंत बाहेर गेली .आता दहा बारा वर्षाची मुल गळ्यात ढोलकी अडकवून उभी असतात आणि ठेका चुकत नाहीत ,संपूर्ण भजनाला एक ठराविक पद्धतीचा ठेका आहे पण दोन रामनवमीचे आंब्याचे पन्हे प्यायल्याखेरीज ,रामा रामा हो रामा या गजरावर नाचल्या खेरीज हि ढोलकी वाजवायला जमत नाही हे खर .
या भजनाचा एक साचा ठरलेला आहे ,ती गोष्ट त्याच क्रमाने आणि त्याच सुरात होणार ,जरा कुठे गंधाराच्या जागी मध्यम लागला कि जेष्ठ मंडळी डोळे मोठे करणार ,आणि नाही हो ते ऐकायला कानांना खटकतच .
वरील सवाई ने नमन झाले कि धडाधड रामदासी सवाया सुरु .
रामदास....
वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।
जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा । । १
राम राम राम । जन सज्जन विश्राम ।
साधकाचे निजधाम । हित आपुले करा । । २
अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।
बोले भागवत व्यास । हरिभजने तरा । । ३
धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।
सोडविले सुरवर । वरदायक खरा । । ४
म्हणावा जयजय राम !
धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान ।
पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला । । १
वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर ।
करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली । । २
कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती ।
पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या । । ३
भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय ।
भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
रोज सवाई वेगळी .सवाई संपली कि एका सुरात सुरु .
परम सुंदर रूप श्यामल ,इंद्रनील किलकांती कोमल
भायनिवारण भक्त वत्सल ,वर पराक्रम कीर्ती विमल
भुवन कंटक दैत्य मारक,अमर मोचन दैत्य हारक
विकट विशमताल छेदक ,वराह नामक दैत्य भेदक
दश्मुखादिक शिरछेदक,ऋषिमुनिजन चित्त वेधक
अमर भूषण उत्तमोत्तमा,भुवन पालक हा राघोत्तमा
विरविरान्तक हा विरोत्तम ,असुरान्तकहा असुरोत्तम
बहुत पीडक दैत्य भंजन ,ऋषिमुनिजन योगी रंजन
दुरित दानव दुष्ट कंदन ,अतुल कीर्तन व्यस्त व्यंजन
जयजय मार्तंड वंशावतंस,जयजय कैवल्यधाम
जयजय भरताग्रज,जयजय सीतारमण
जयजय सिंहासनाधीश्वर ,जयजय सुरराज विराजित पद
नमस्ते नमस्ते नमस्ते .
हि रचना बहुधा रामदासी असावी ,पण हे नमस्ते नमस्ते कोठून आलय माहित नाही .
हे झाल कि आरती आणि नंतर प्रदक्षिणा .
अच्युतम केशवम ने प्रदक्षिणेला सुरवात ,आणि रामा रामा हो रामा हा गजर ,तो प्रत्येक दिशेच्या कोपर्यात दुगुणी ,चौगुणी वेगात ,तिथे ढोलकीची जुगलबंदी .त्या ढोलकीच्या आवाजात रामारामा हे शब्द विरून जायचे ,नाचायचं ,कि परत मूळ वेगात रामा रामा हो रामा सुरु .
मग देवळात परत अत्माजारामा हि आरती ,रोजच्या वारा प्रमाणे त्या त्या देवाची आरती .
नंतर कोणीतरी एखाद भजन सांगायचं आणि परत भोवरी [नाचत वर्तुळाकार प्रदक्षिणा ]सुरु .यात देखील पदन्यास ठराविक पद्धतीने ,म्हणजे आधी ग्यानबा तुकाराम सारख ,नंतर दीड पायावर जॉगिंग केल्यासारखं ,मग एक पाऊल उजव्या हाताला आधी पाठी आणि मग पुढे असा उडवत नाचायचे आणि भजनाला अगदी विठूचा गजर हरिनामाचा पासून कुठलाही जागर .इथे आणखीन एक नियम प्रत्येक ओळी नंतर "हरिहर " म्हणायचं .इथे नाचताना शरीराचा कस लागायचा.सुरवातीला नाचणारी मंडळी जस वय वाढत जाईल तस पोझिशन बदलायची म्हणजे इतर नाचताना गोलाच्या मध्यभागी राहून हात वर खाली करत डायरेक्शन देणे ,एकाच जागेवर नाचणारे जास्त वेळ नाचत बसले कि पुढे चला म्हणून हाताने सांगणे ,बाजूच्या खिडकीत जाऊन बसणे,एका जागेवर उभ राहून घंटा बडवत राहणे ,देवळातून हळूच बाहेर सटकून गोविंद बापूंच्या अंगणात डोक्यावरील टोपीने वारा घेत बसणे.दोन तास अक्षरशः स्ट्रेस टेस्ट ,बी पी .सगळ चेक व्हायचं .मग खणखणीत आवाजात ऋग्वेदी देवे आणि मग अत्यंत टिपेत "सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा" या श्लोक पासून "कळेना पुढे काय होणार आहे "हे पाच रामदासी श्लोक .
रामाला रोज उसळीचा नैवेद्य ,ती देण्यासाठी रोज अनेक भक्तांचे नंबर लागलेले ,यांना घुगर्या म्हणायचं .देवळात कळेना पुढे चालू झाल कि बाहेरील अंगणात "घुगर्यो"अशी बोंबाबोंब .
अत्ता माझ्या डोळ्यासमोर आहेत ते दीड पावलावर नाचणारे अप्पा वैद्य ,अण्णाकाका ,भार्गावकाका बापट ,धोतराचे ओचे बांधून घुगर्यांचे पातेले घेऊन घुगर्या वाटणारे दत्तूकाका ,अप्पा सोमण ,खाकी भागवत मास्तर [कायम खाकी शर्ट घालायचे ]पायरीवर बसून बोंबाबोंब करतात म्हणून ओरडणारी पार्वती काकू ,शांतपणे सगळ्यांचे स्वागत करणारे ,सगळ्यांना पाणी ,पानसुपारी देणारे ,"निवास ,आलास कधी ? केशव येणार आहे का ?अशी विचारपूस करणारे गोविन्द्बापू .सगळे सगळे निजधामास गेले .
उत्सव सुरु झाला आहे मनात रामारामा हो रामा पिंगा घालायला लागले आहे .
सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया
महाराज दे अंगीचे वस्त्र आता
बहुजीर्ण झाली देह बुद्धी कंथा !
यातील तुझा मधील झा आणि अंत्याक्षर दीर्घ म्हणायचे ,तुझा ,सदा .महाराज मधील महा हि अक्षर ठासून म्हणायची ,स्वर साधारण पंचम किवा षड्जात .नक्की माहित नाही पण शे सव्वाशे वर्ष नक्की झाली .गुढी पाड्व्यापासून दशमी पर्यंत रात्री ०९.३० वाजता लक्ष्मी नारायण देवळात वरील श्लोकाचे सूर याच पद्धतीने म्हटले जात आहेत ,अनेक पिढ्या रामतीर्थावर इतिहास जमा झाल्या पण नवीन पिढी त्याच जोशात ,किंबहुना अधिक चांगला हा आमचा रामनवमीचा उत्सव साजरा करीत आहे .
सगळे गावकरी साधारण ०९.१५ पासून कै.गोविंद बापूंच्या अंगणात तसेच जमा होत आहेत ,काही मुल पार्वती काकुच्या घराच्या पायरीवर बसली आहेत ,एकदा हि सवाई सुरु झाली कि खिशातील टोपी डोक्यावर चेपून देवळात प्रवेश करायचा ,लक्ष्मी नारायणाला नमस्कार ठोकायचा आणि गाभार्याच्या दरवाजा बाहेर दोन बाजूला दोन भाग करून गळ्यात ढोलकी आणि टाळ घेऊन उभे राहायचे ,पूर्वी रामाच्या सन्मुख देवळाच्या वेशीवर हनुमंतराय होते त्यांना आता देवळाच्या नूतनी करणात देवळात जागा मिळाली ,म्हणजे अंजनीपुत्र जागेवरच आहेत ,मंदिराची भिंत बाहेर गेली .आता दहा बारा वर्षाची मुल गळ्यात ढोलकी अडकवून उभी असतात आणि ठेका चुकत नाहीत ,संपूर्ण भजनाला एक ठराविक पद्धतीचा ठेका आहे पण दोन रामनवमीचे आंब्याचे पन्हे प्यायल्याखेरीज ,रामा रामा हो रामा या गजरावर नाचल्या खेरीज हि ढोलकी वाजवायला जमत नाही हे खर .
या भजनाचा एक साचा ठरलेला आहे ,ती गोष्ट त्याच क्रमाने आणि त्याच सुरात होणार ,जरा कुठे गंधाराच्या जागी मध्यम लागला कि जेष्ठ मंडळी डोळे मोठे करणार ,आणि नाही हो ते ऐकायला कानांना खटकतच .
वरील सवाई ने नमन झाले कि धडाधड रामदासी सवाया सुरु .
रामदास....
वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।
जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा । । १
राम राम राम । जन सज्जन विश्राम ।
साधकाचे निजधाम । हित आपुले करा । । २
अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।
बोले भागवत व्यास । हरिभजने तरा । । ३
धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।
सोडविले सुरवर । वरदायक खरा । । ४
म्हणावा जयजय राम !
धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान ।
पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला । । १
वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर ।
करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली । । २
कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती ।
पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या । । ३
भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय ।
भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
रोज सवाई वेगळी .सवाई संपली कि एका सुरात सुरु .
परम सुंदर रूप श्यामल ,इंद्रनील किलकांती कोमल
भायनिवारण भक्त वत्सल ,वर पराक्रम कीर्ती विमल
भुवन कंटक दैत्य मारक,अमर मोचन दैत्य हारक
विकट विशमताल छेदक ,वराह नामक दैत्य भेदक
दश्मुखादिक शिरछेदक,ऋषिमुनिजन चित्त वेधक
अमर भूषण उत्तमोत्तमा,भुवन पालक हा राघोत्तमा
विरविरान्तक हा विरोत्तम ,असुरान्तकहा असुरोत्तम
बहुत पीडक दैत्य भंजन ,ऋषिमुनिजन योगी रंजन
दुरित दानव दुष्ट कंदन ,अतुल कीर्तन व्यस्त व्यंजन
जयजय मार्तंड वंशावतंस,जयजय कैवल्यधाम
जयजय भरताग्रज,जयजय सीतारमण
जयजय सिंहासनाधीश्वर ,जयजय सुरराज विराजित पद
नमस्ते नमस्ते नमस्ते .
हि रचना बहुधा रामदासी असावी ,पण हे नमस्ते नमस्ते कोठून आलय माहित नाही .
हे झाल कि आरती आणि नंतर प्रदक्षिणा .
अच्युतम केशवम ने प्रदक्षिणेला सुरवात ,आणि रामा रामा हो रामा हा गजर ,तो प्रत्येक दिशेच्या कोपर्यात दुगुणी ,चौगुणी वेगात ,तिथे ढोलकीची जुगलबंदी .त्या ढोलकीच्या आवाजात रामारामा हे शब्द विरून जायचे ,नाचायचं ,कि परत मूळ वेगात रामा रामा हो रामा सुरु .
मग देवळात परत अत्माजारामा हि आरती ,रोजच्या वारा प्रमाणे त्या त्या देवाची आरती .
नंतर कोणीतरी एखाद भजन सांगायचं आणि परत भोवरी [नाचत वर्तुळाकार प्रदक्षिणा ]सुरु .यात देखील पदन्यास ठराविक पद्धतीने ,म्हणजे आधी ग्यानबा तुकाराम सारख ,नंतर दीड पायावर जॉगिंग केल्यासारखं ,मग एक पाऊल उजव्या हाताला आधी पाठी आणि मग पुढे असा उडवत नाचायचे आणि भजनाला अगदी विठूचा गजर हरिनामाचा पासून कुठलाही जागर .इथे आणखीन एक नियम प्रत्येक ओळी नंतर "हरिहर " म्हणायचं .इथे नाचताना शरीराचा कस लागायचा.सुरवातीला नाचणारी मंडळी जस वय वाढत जाईल तस पोझिशन बदलायची म्हणजे इतर नाचताना गोलाच्या मध्यभागी राहून हात वर खाली करत डायरेक्शन देणे ,एकाच जागेवर नाचणारे जास्त वेळ नाचत बसले कि पुढे चला म्हणून हाताने सांगणे ,बाजूच्या खिडकीत जाऊन बसणे,एका जागेवर उभ राहून घंटा बडवत राहणे ,देवळातून हळूच बाहेर सटकून गोविंद बापूंच्या अंगणात डोक्यावरील टोपीने वारा घेत बसणे.दोन तास अक्षरशः स्ट्रेस टेस्ट ,बी पी .सगळ चेक व्हायचं .मग खणखणीत आवाजात ऋग्वेदी देवे आणि मग अत्यंत टिपेत "सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा" या श्लोक पासून "कळेना पुढे काय होणार आहे "हे पाच रामदासी श्लोक .
रामाला रोज उसळीचा नैवेद्य ,ती देण्यासाठी रोज अनेक भक्तांचे नंबर लागलेले ,यांना घुगर्या म्हणायचं .देवळात कळेना पुढे चालू झाल कि बाहेरील अंगणात "घुगर्यो"अशी बोंबाबोंब .
अत्ता माझ्या डोळ्यासमोर आहेत ते दीड पावलावर नाचणारे अप्पा वैद्य ,अण्णाकाका ,भार्गावकाका बापट ,धोतराचे ओचे बांधून घुगर्यांचे पातेले घेऊन घुगर्या वाटणारे दत्तूकाका ,अप्पा सोमण ,खाकी भागवत मास्तर [कायम खाकी शर्ट घालायचे ]पायरीवर बसून बोंबाबोंब करतात म्हणून ओरडणारी पार्वती काकू ,शांतपणे सगळ्यांचे स्वागत करणारे ,सगळ्यांना पाणी ,पानसुपारी देणारे ,"निवास ,आलास कधी ? केशव येणार आहे का ?अशी विचारपूस करणारे गोविन्द्बापू .सगळे सगळे निजधामास गेले .
उत्सव सुरु झाला आहे मनात रामारामा हो रामा पिंगा घालायला लागले आहे .